गुरुदत्तने वयाच्या ३२व्या वर्षी ‘प्यासा’, ३४व्या वर्षी ‘कागज के फूल’, ३६व्या वर्षी ‘साहिब बीबी और गुलाम’ केला आणि वयाच्या ३९व्या वर्षी हे जग सोडले!

चंदेरी दुनियेचे रिवाज आणि बेमुर्वतपणा गुरुदत्तना माहिती होता, पण तरीही त्यांनी कलात्मक चित्रपट काढले. ‘Cash and classics’ या लेखात (‘सेल्युलॉइड’ या मासिकातील लेख) गुरुदत्त म्हणतात, “कलात्मक मूल्ये आणि यश यांचे गणित जपण्याचा प्रयत्न करायला हवा. जगातील अनेक कलासक्त माणसांनी सातत्याने हे अपयश आणि अवहेलना पचवली आहे... बुचकळ्यात टाकणाऱ्या या अनिश्चिततेमुळे खरे तर, निर्मितीच्या उत्कट आनंदाची ‘नशा’ अनुभवता येते.”.......

सत्यजित राय यांची गणना डी सिका, फेडरिक फेलिनी, किंवा अकिरा कुरोसावा यांच्याबरोबर केली गेली. भारतीय सिनेमासाठी ही एक मोठीच गोष्ट होती, आहे

राय यांच्या चित्रपटांचा एका सूत्रात विचार करता येईल की, नाही माहीत नाही, परंतु एक खरे की, माणूस आणि त्याची वृत्ती-प्रवृत्ती हा त्यांच्या चिंतनाचा भाग आहे. ते परिस्थिती हादेखील एक महत्त्वाचा घटक मानताना दिसतात. आपल्या चित्रपटांबद्दल सत्यजित राय यांनी असे म्हटले होते की, मध्यमवर्गीय बंगाली संस्कृतीमधील प्रेक्षक मला अभिप्रेत असतो. त्याचमुळे त्यांनी बदलत चाललेल्या मूल्यांना स्वत:चे असे एक ‘स्टेटमेंट’ दिले.......